काय तुम्ही पण मुलांना सुधारण्यासाठी त्यांना मारहाण करता?, संशोधनात समोर आली धक्कादायक महिती, जाणून घ्या
नवी दिल्ली (New Delhi) : research on children | भारतात लहानपणी नेहमी चूक केल्यानंतर मोठ्यांकडून मार मिळतो. आता एका संशोधनातून (research on children) समजले आहे की मुलांना मारहाण केल्याने कोणताही लाभ न होता उलट मुलांसाठी ते धोकादायक ठरू शकते. संशोधनात म्हटले आहे की, यामुळे मुले हिंसक आणि जिद्दी (assaulting children makes them more violent) होतात.
research on children research says assaulting children makes them more violent research on childrens behavior
Supreme Court । ‘कोरोना मृतांचे मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी’
वागण्यावर होतो प्रतिकूल परिणाम
या संशोधनात मुलांचा स्वभाव सुधारण्यासाठी त्याना थप्पड मारणे किंवा मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यात म्हटले आहे की, असे केल्याने मुलांच्या वागण्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
संशोधन 20 वर्षांच्या अभ्यासांवर आधारित
हे संशोधन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) आणि तज्ज्ञांच्या एका अंतरराष्ट्रीय टीमने मिळून केले आहे, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहेत. हे संशोधन 20 वर्षांच्या अभ्यासावर आधारित आहे.
25 कोटी मुलांचा होतो छळ
या संशोधनात केवळ एका देशाला नव्हे, तर जगभरातील 69 रिपोर्टचा समावेश करून हा निष्कर्ष काढला आहे. जगभरात दोन ते चार वर्षांच्या दोन तृतीयांश (63 टक्के) सुमारे 25 कोटी मुले आपल्या पालकांकडून किंवा देखरेख करणार्यांकडून शारीरिक शिक्षेचा सामना करतात.
शिक्षा आणि आक्रमकतेचा संबंध
डॉक्टर अंजा हेलेन यांनी याबाबत पुढे सांगितले की, शारीरिक शिक्षा देणे अप्रभावी आणि नुकसानदायक आहे यातून मुले आणि त्यांच्या कुटुंबाला कोणताही लाभ होत नाही. आम्ही शारीरिक शिक्षा आणि वागण्यासंबंधी अडचणी जसे की, आक्रमकता यांच्यात एक संबंध दिसून येतो.
अनेक देशात मुलांच्या मारहाणीला बंदी
जगातील अनेक देशात मुलांना मारहाण करण्यावर बंदी आहे. स्कॉटलँड आणि वेल्ससह 62
देशांमध्ये अशाप्रकारचे वागण्यावर बंदी आहे आणि याची कक्षा आणखी वाढत आहे. इंग्लंड आणि
नदर्न आयर्लंडसह अनेक देशांमध्ये मुलांना शारीरिक शिक्षा देण्यावर बंदी लावण्याची मागणी वाढत
चालली आहे.
स्वभाव होतो आणखी खराब
या अभ्यासातून स्पष्टपणे समजत आहे कि शारीरिक शिक्षा, त्यांच्या सोबत केली जाणारी मारहाण
त्यांचा स्वभाव बदलतो जो नकारात्मक असतो. यामुळे त्यांचे वागणे, स्वभाव आणखी खराब होतो.
दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ