Bigg Boss 14 : ‘भाईजान’ सलमाननं पुन्हा नाव न घेता अर्णब गोस्वामीला काढला चिमटा !

पोलिसनामा ऑनलाईनः अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा न्युज चॅनल रिपब्लिकचे एडीटर इन चीप अर्णब गोस्वामी यांना चिमटा काढला आहे. त्यानंतर बीग बॉसच्या घरात एकच हशा पिकला. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसच्या 14 सीझनपासून चर्चेत आहे. घरात फ्रेशर्स आणि ज्युनिअर यांच्यात वाद होतात. सोबतच मजा आणि मस्तीही सुरु असते. वीकेंडला सलमान खान शो मध्ये आल्याने वातावरण काहीस आनंदाच होत. घरात तणावाच वातारवण असेल तर तो सर्वांचा मूड ताजातवाणा होईल, असे बोलतो. त्याने पुन्हा एकदा न्युज चॅनल रिपब्लिकचे एडीटर इन चीप अर्णब गोस्वामी यांना चिमटा काढला आहे.

बिग बॉसमध्ये रविवारी सलमान खान जान कुमार सानूसोबत बोलताना म्हणाला की, तो कोणाच्यातरी इशा-यावर नाचत आहे. जान घरात कुणाच ऐकत नाही. कधी- कधी तर तो स्वतःचही ऐकत नाही. तस पाहिल तर तिन्ही सिनिअर्सनंतर जान हाच डोक्याने सिनिअर आहे. त्यानंतर सलमानने जानला समजावत सांगितल की, मी नाही म्हणत की, This want to know, That want to know, सोप आहे. मला हे जाणूून घ्यायच की, तू कोणत्या मार्गावर चालत आहे. अर्णब गोस्वामी त्याच्या शो मध्ये नेशन वॉंट्स टू नो अस म्हणतात अस नेमही ऐकायला मिळत.

टीआरपी स्कॅमवरून मारला होता टोमणा
दरम्यान गेल्या आठवड्यात सलमानने अर्णब गोस्वामीला टोमणा मारला होता. सलमाने बिग बॉसच्या घरातील लोकांना सांगितले की, त्यांनी आपला खेळ पुढे चांगल्या प्रकारे खेळावा. तसेच केवळ टीआरपी मिळविण्यासाठी काहीही करू नका, नाहीतर चॅनल बंद होईल.यावर अर्णब गोस्वामीची प्रतिक्रिया आली होती. त्याने सलमानवर निशाणा साधला होता.

रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी हेरफेरीचा आरोप
दरम्यान रिपब्लिक टीव्हीवर टीआरपीमध्ये हेरफेर करण्याचा आरोप लागला होता. टीआरपी स्कॅमच्या खुलाशात पोलिसांनी सांगितले की, सुशांतसिंह रजपूत केसच्या कव्हरेज दरम्यान काही चॅनल्सनी कशाप्रकारे फेक टीआरपी मिळवला होता. टीआरपी स्कॅम समोर आल्यावर या चॅनल्सना सोशलमिडियावर ट्रोल करण्यात आल होत.