SBI नं ‘जनधन’ खातेधारकांना केलं अलर्ट ! कधी काढायचे पैसे, अकाऊंट नाही होणार ‘ब्लॉक’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम गरीब आणि मजूरांवर जास्त प्रमाणात होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी सरकार गरीब कल्याण योजनेंतर्गत जन धन खातेदार महिला, गरीब वृद्ध, गरीब विधवा आणि गरीब अपंग यांच्या खात्यात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी मदत पाठवित आहे. हे पैसे काढण्यासाठी लोक बॅंकेमध्ये गर्दी करत आहेत.
We would like to assure our customers that the funds in your account will not be blocked or returned to the Government. You may withdraw the same at your convenience anytime. Don't believe in rumours. @challasetty#SBI #PMJDY https://t.co/aRsA70Yz9h
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 9, 2020
खात्यामध्ये 500 रुपये जमा
या दिशानिर्देशात प्रधानमंत्री जन धन योजनेच्या 20 कोटीहून अधिक महिला खातेदारांच्या खात्यात 500 रुपये जमा झाले आहेत. हा हप्ता एप्रिल महिन्यातील आहे. मे आणि जूनमध्ये 500-500 रुपयांच्या आणखी दोन हप्तेही देण्यात येणार आहे. लाभार्थी ‘सामाजिक अंतर’ ची आवश्यकता लक्षात ठेवून तुम्ही रक्कम काढू शकतात.
एसबीआयने दिला विश्वास
एसबीआयनेही ग्राहकांना याबाबत आश्वासन दिले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारकडून मिळालेले पैसे त्यांच्या मालकीचे आहेत आणि हा ब्लॉक होणार नाही, किंवा सरकार ते परत घेणार नाही. म्हणून अफवांच्या प्रभावाखाली येऊन घाबरू नका. खातेदार त्यांच्या सोयीनुसार गरज असेल तेव्हा पैसे काढू शकतात.
अफवांवर विश्वास ठेवू नका
वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ट्वीट करून लोकांना कोणत्याही अफवांमध्ये अडकू नये, असे आवाहन केले आहे. खात्यात असे म्हटले आहे की, खात्यातून मिळालेले पैसे हे लाभार्थीचे आहेत आणि ते आपल्या सोयीनुसार पैसे काढू शकतात. जर खातेदारांना हे पैसे आता काढायचे नसतील तर, ते नंतर कधीही काढू शकतात.
गरीब कल्याण योजना वाल्यांना अतिरिक्त 1000 रुपये मिळणार
गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब वृद्ध, गरीब विधवा आणि गरीब अपंगांना पुढील तीन महिने 1000 रुपये अतिरिक्त मिळणार आहे. हे दोन हप्त्यांमध्ये डीबीटीमार्फत त्याच्या बँक खात्यात जातील. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 8.70 लाख शेतकर्यांच्या खात्यात २० हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे, असेही सरकारने म्हटले आहे. याशिवाय मनरेगामधील दैनंदिन वेतन 202 रुपये करण्यात आले आहे.