‘लॉकडाऊन’मध्ये ‘जादा’ सूट दिल्यास वैज्ञानिकांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या 25 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. मागील वेळी मिळालेल्या सवलती लक्षात घेता 31 मे नंतर लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सूट देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढतील आणि वर्षाच्या अखेरीस देशातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना विषाणूची लागण होईल, असे ज्येष्ठ विषाणू वैज्ञानिक डॉ. व्ही. रवी यांनी म्हटले आहे.

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी भारताने अनेक पावलं उचलली. कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी घेण्याची क्षमता भारताने वाढवली आणि साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लोकांच्या गर्दीस रोखण्यासाठी आपल्या घरात बसण्याचे आवाहन केले. या आवाहनाला अनेक लोकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थोड्याफार प्रमाणात कमी झाला.

कोरोना विषाणूचा प्रसार चीनपासून झाला असला तरीही आता संपूर्ण आशिया खंडातील सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत. कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाच्या सर्वात जास्त राज्य असलेल्या देशांमध्ये भारत नवव्या स्थानी पोहचला आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने रहदारी सेवा बंद करण्यात आली. परंतु आता सर्व काही हळूहळू ट्रॅकवर परत येत आहे. पण काही केले तरी अद्याप कोरोना विषाणूचा परिणाम कमी होण्याचे नाव घेत नाही.

नॅशनल इस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅड न्युरोसायन्स (निम्हंस) चे न्यूरो व्हायरोलॉजीचे प्रमुख व्ही. रावी यांचे मत होते की केवळ लॉकडाऊनमुळे देशातील संक्रमणाची गती कमी झाली आहे. पण येणारे दिवस यापेक्षाही वाईट असू शकतात, असा धोका त्यांनी वर्तवला आहे.