शाहरुख खानच्या ‘या’ सवयीला कंटाळून गौरीनं केलं होतं ‘ब्रेकअप’, मग अशा प्रकारे पून्हा झाले ‘पॅचअप’

पोलिसनामा ऑनलाईन – सुपरस्टार्स शाहरुख खान आणि गौरी खानची लव्ह स्टोरी म्हणजे ही बॉलिवूडमधील चर्चित आणि लोकप्रिय प्रेम कहाणीमधील एक. गुरुवारी गौरी तिचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. लग्नाआधी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते आणि तिचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबात झाला होता. गौरी शाहरुखची पहिली भेट १९८४ मध्ये दिल्ली येथे झाली होती.

जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा शाहरुख सुपरस्टार नव्हता. पण त्यावेळी त्याने आपोळ्या करिअरची सुरुवात सुद्धा केली नव्हती. त्यावेळी शाहरुख खानची आर्थिक परिस्थिती काही विशेष नव्हती आणि गौरी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. दोघांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या पण शेवटी त्यांचे प्रेम पूर्ण झाले.

शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यात काहीदिवसापूर्वी भांडण झाले होते. शाहरुख खानवर गौरी इतकी रागावली होती की तिने शाहरुख खानबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक, शाहरुख खानला गौरीने इतरांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणे पसंत नव्हते.

जेव्हा शाहरुख गौरीची भेट अक्सा बीचवर झाली

शाहरुख खान ची ही टोलवा टोलवी गौरीला आवडली नाही आणि एक दिवस तिने शाहरुखशी बोलणे बंद करण्याचा निर्णय घेतला. गौरी शाहरुख खानचा फोन देखील उचलत नव्हती,आणि ती मुंबईला निघून गेली. मात्र, शाहरुखचे तिच्यावरील प्रेम इतके होते की तोही तिच्या मागे मुंबईला गेला. दोघांनी अक्सा बीचवर भेट घेतली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.