मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपचे सरकार येता येता राहिलं आणि भाजपमधील इनकमिंग करणाऱ्याचा भ्रमनिरास झाला. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मागील सरकारने सुरु केलेल्या अनेक प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. परंतु आता हे नवं सरकार आल्यानंतर आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेकडून आपल्याला धमकी देण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनी यासंबंधित पत्र राज्याचे राज्यपाल आणि गृहसचिव यांनी लिहिले आहे. यात त्यांनी शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणले.
किरीट सोमय्या यांनी सांगितले की सत्तेत आल्यानंतर शिवसेनेकडून धमकी देण्यात येत आहे, शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका आहे. शिवसेनेकडून आपल्यावर हल्ला होऊ शकतो. आपण ही माहिती राज्यपाल आणि गृह सचिवांना कळवली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील वाद सर्वांना माहित आहे. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. त्यानंतर लोकसभेवेळी युतीत असलेल्या शिवसेनेने किरीट सोमय्या यांना खासदारकीचे तिकीट देण्यास विरोध केला होता. यामुळे भाजपकडून किरीट सोमय्या याचे खासदारकीचे तिकीट कापण्यात आले होते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती