वर्षभरदेखील टिकलं नाही ‘मनीषा’, ‘मल्लिका’सह ‘या’ फेवरेट 8 स्टार्सचं लग्न, मेहंदीचा रंग उतरायच्या आधीच झाला ‘तलाक’ !

बॉलिवूडमध्ये अनेक कपल असे आहेत ज्यांचं अफेअर खूप गाजलं परंतु लग्न मात्र एक वर्षही टिकलं नाही. खास बात अशी की, यात जास्त लव मॅरेज आहेत. काही तर असे आहेत ज्यांच्या मेंदीचा रंगही उतरला नाही आणि त्यांनी तलाक घेतला आहे.

1) मनीषा कोईराला – मनीषानं 38 व्या वर्षी नेपाळी बिजनेसमन सम्राट दहल सोबत नेपाळमध्येच लग्न केलं होतं. परंतु एका वर्षाच्या आतच सम्राट आणि मनीषा यांच्या नात्यात कटुता आली. दोन वर्षांनंतर ते वेगळे झाले. मनीषानं कॅन्सरसोबत लढाई जिंकली आहे.

2) करण सिंग ग्रोवर – करण सिंग ग्रोवर आणि श्रद्धा निगम हेदेखील एकमेकांच्या प्रेमात पागल होते. यामुळे दोघांनी 2008 मध्ये लग्न केलं होतं. परंतु करणच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर श्रद्धानं या लग्नाचा शेवट केला. 10 महिनेच हे नातं टिकलं. झलक दिखला जा या रिअ‍ॅलिटी शोची कोरियोग्राफर श्रद्धा निकोस हिच्यासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

3) चाहत खन्ना – चाहतनं 2016 मध्ये भरत नरसिंघानी नावाच्या एक बिजनेसमनसोबत लग्न केलं होतं. पतीच्या हिंसाचार आणि मारहाणीला कंटाळून तिनं 8 महिन्यातच तलाक घेतला. यानंतर तिनं फरहान मिर्झासोबत लग्न केलं. हेही लग्न जास्त टिकलं नाही. तिला दोन मुली आहेत. 2 वर्षांची जोहर आणि 11 महिन्यांची अमायरा.

4) मंदना करीमी – बिग बॉसची माजी स्पर्धक अ‍ॅक्ट्रेस मंदाना करीमी हिनं 25 जानेवारी 2017 रोजी बिजनेसमन गौरव गुप्ता सोबत लग्न केलं होतं. 6 महिन्यांच्या आतच दोघांचं लग्न तुटलं. मंदानानं गौरववर घरगुती हिंसेचा आरोप केला होता. मंदानानं असंही सांगितलं की, तिच्या सासरच्या मंडळींना तिचं धर्मपरिवर्तन करायचं होतं. ते मंदानाच्या मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टींगमुळं नाराज होते.

5) मल्लिका शेरावत – मल्लिका बॉलिवूडध्ये येण्याआधीच तिचं लग्न झालं होतं. परंतु तिनं हे कधीच कबुल केलं नाही की तिचं लग्न झालं आहे. तिचे असे अनेक फोटो समोर आले होते ज्यातून तिचं लग्न झाल्याचं समजत होतं. तिचं लग्न पायलट करण सिंग गिल सोबत झालं होतं. नंतर मात्र तिनं लग्नाऐवजी करिअरची निवड केली आणि ती पती पासून वेगळी झाली. 12 महिन्यातच दोघं वेगळे झाले. तिच्या अ‍ॅक्ट्रेस बनण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

6) सारा खान – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस सारा खान आणि अ‍ॅक्टर अली मर्चेंट यांचं लग्न कोणापसूनच लपून राहिलेलं नाही. दोघांनी बिग बॉस सीजन 4 च्या घरात लग्न केलं होतं. परंतु 2 महिन्यातच हे लग्न मोडलं. नंतर असेही आरोप झाले की, सारा आणि अली यांना लग्न करण्यासाठी चॅनलनंच 5 लाख दिले होते. परंतु चॅनलनं या बातमीचं खंडन केलं होतं.

7) पुलकित सम्राट – पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा एकमेकांवर प्रेम करत होते. 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं. परंतु नंतर मात्र पुलकित आणि यामी गौतम यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर श्वेतानं आपला रस्ता निवडला. श्वेता यामीला आपल्या घटस्फोटासाठी जबाबदार मानते. तर पुलकित म्हणतो, श्वेता योग्य जोडीदार नव्हती त्यामुळे ती वेगळी झाली. हे लग्न 12 महिनेच टिकले. 2015 मध्ये त्यांनी तलाख घेतला.

8) हितेन तेजवानी – टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा हितेन तेजवानी याची गौरी प्रधान ही दुसरी पत्नी आहे. याआधी तिचं अरेंज मॅरेज झालं होतं जे 11 महिने टिकलं होतं. बिग बॉस 12 मध्ये हितेननं याबाबत खुलासा केला होता.