धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, प्रचंड खळबळ
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बाबाजी विठ्ठल बडे, पत्नी कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य बाबाजी बडे, धनंजय बाबाजी बडे (सर्व रा. बडेमळा, गुणोरे, ता. पारनेर) मयतांची नावे आहेत. यातील आदित्य बडे हा दिव्यांग असून, कविता बडे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
रात्री नेहमीप्रमाणे बडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. सकाळी बडे यांच्या घरातून कोणीच आले नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी पाहणी केली असता पाहिले असता कुटुंबातील चौघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पारनेर पोलिसांचे पथक तातडीने गावात बडे मळ्यात दाखल झाले. पोलिसांनी चौघांचे मृतदेह पंचनामे करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पथक गुणोरे येथे असून, त्यांच्याकडून बडे यांनी नेमकी का आत्महत्या केली असावी, याचा तपास सुरू आहे.
- ‘पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्या असेच ५ फायदे
- किडनी डॅमेज आहे का ? फक्त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्ट करून समजू शकते
- कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्या याचे ८ फायदे
- सकाळी लिंबूपाणी पिल्याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
- कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया
- ‘हे’ आहेत लिव्हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
- शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी
- शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक