दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना 3 तरुणांचा मृत्यू, विरारमधील घटना

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनच्या काळात विरार येथे एका बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करताना 3 तरुणांचा मृत्यू झालाा आहे. ही घटना शुकवारी दुपारी विरार येथे घडली. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

विरार पश्चिमच्या बोळींजमधील रानपाडा गावात राहणार्‍य हेमंत घरत यांनी बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते. याच गावात राहणार्‍या तरुणांनी टाळेबंदीच्या काळात पैसे मिळतील म्हणून हे काम स्वीकारले. मात्र दुपारी काम करत असतांना आतमध्ये विषारी वायुमुळे त्यांचा  जीव गुदमरला. त्यानंतर त्यांना विरार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे या तिघांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला होता. तर नितेश मुकणे याच्यावर विरार मधील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या बाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.