Uddhav Thackeray On BJP | उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल; म्हणाले – ‘भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना ’चिता सरकार’ म्हणायचं का?‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray On BJP | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले 8 चित्ते सोडण्यात आले. यावरून सोशल मीडियावर मजेदार मीम्सचा पाऊस पडत असून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाची खिल्ली उडवली आहे. भाजपा आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायची, आता त्यांना ’चिता सरकार’ म्हणायचे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. (Uddhav Thackeray On BJP)

 

प्रताप सरनाईक केसवरून उद्धव ठाकरे म्हणाले, प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहे का? मग केस मागे घेण्याची घाई का? प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत आहे. सरनाईक भाजपासोबत गेल्याने लॉन्ड्रीत टाकून, धूवून चकाचक करण्याचा हा प्रयत्न आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला समोरून आव्हान आले की चेव चढतो. शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात आहे आणि सगळे एकत्र होत आहेत. सगळ्यांनी एकत्र व्हावे, हीच माझी अपेक्षा होती. विरोधकांना वेगवेगळे मारण्यामध्ये काही गंमत नसते. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते.

 

Web Title :- Uddhav Thackeray On BJP | shivsena Chief uddhav thackeray slams bjp over 8 cheetahs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

Narayan Rane | नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत’

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू