पुढच्या स्ट्राईकवेळी विरोधकांना विमानाखाली बांधून नेले पाहिजे : व्ही. के. सिंग

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत तेथील दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर मात्र भारतात दहशतवाद्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे. पुढच्या स्ट्राईक वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना विमानाला बांधलं पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे.

‘पुढच्या वेळी भारताने जर काही केलं तर मला वाटतं विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांनी विमानाच्या खाली बांधून नेलं पाहिजे. जेव्हा बॉम्ब सोडणार असतील तेव्हा टार्गेट बघून घेतील. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवलं पाहिजे. यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावं’, असं ट्वीट व्ही के सिंग यांनी केलं आहे. हे ट्वीट करण्याआधी त्यांना अजून एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्येही विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला होता.

रात्री ३.३० वाजता खूप मच्छर होते म्हणून मी हिट मारलं. आता किती मच्छर मारले हे मोजत बसू…की आरामशीर झोपू ?, असं व्ही के सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं होते.

तुम्ही गोष्टी मोजत बसणार आहात का ? बॉम्बस्फोट घडवण्यात आले. इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या…1000 किलोचा बॉम्ब टाकल्यानंतर लोकांचा मृत्यू होणार नाही का ? जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही किती जण गेले आहेत याचा अंदाज लावू शकता’, अशी प्रतिक्रिया त्यांनी स्वतःच्या ट्वीटवर केले आहे.

दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी २५० दहशतवादी मारले, असं वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर या वादाला सुरुवात झाली होती.