मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीने एनआरसी, सीएए आणि देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था यावर शुक्रवार, दि. २४ जानेवारीच्या दिवशी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याबाबत दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र्र बंदची घोषणा केली.
दरम्यान या बैठकीस अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरकारी दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले गेले.
सध्या देशभरात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड आंदोलने छेडली जात आहेत, परिणामी या आंदोलनांना हिंसक वळण देखील प्राप्त होत आहे. अशा परिस्थितीतही सरकार दडपशाहीचा वापर करून हा कायदा लागू करण्यासाठी पाऊले उचलत आहे.
दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था ही ढासळलेल्या स्वरूपात आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. एकंदरीतच देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्व परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकाश आंबेडकरांनी या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –