पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने मोठे नुकसानही झाले आहे. त्यातच आता पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Thunderstorms with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely at isolated places in the districts of Pune, Ahmednagar, Satara,Sangli,Hingoli, Beed, Parbhani and Osmanabad during next 3-4 hrs. pic.twitter.com/D1orkBuO8Y
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 8, 2021
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. काल झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आंब्याची झाडे, फुले, हळद आणि फळबागांना याचा मोठा फटका बसला. त्यामध्ये वीज कोसळून अनेकांचा मृत्यूही झाला. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार तासात राज्यात पुण्यासह हिंगोली, बीड, परभणी, अहमदनगर, सांगली, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.