ममता बॅनर्जीने लिहले PM मोदींना पात्र, केली ‘ही’ मागणी

पोलीसनामा ऑनलाईन : जीवनावश्यक वस्तूंच्या (Essentials of life) वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (west bengal chief minister mamata banerjee) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांना पत्र लिहिले आहे. बटाटा आणि कांद्यासारख्या आवश्यक खाद्यपदार्थांच्या किंमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे आणि तसे अधिकार राज्याला द्यावेत, अशीही मागणीही बॅनर्जी यांनी केली आहे.

बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना 4 पानी पत्र लिहिले असून त्यात त्यांनी लिहले आहे की, साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी, पुरवठा वाढवण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहेत. यासाठी तत्काळ पावले उचलत राज्यांना अधिकार प्रदान करावे. कृषी उत्पादने, पुरवठा, वितरण आणि विक्रीवर नियंत्रण येणे आवश्यक आहे. असे नियंत्रण आणता यावे यासाठी राज्यांनी कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

तसेच राज्य सरकारला असे अधिकार द्या की, राज्य सरकार सामान्य जनतेच्या समस्यांकडे केवळ पाहत बसू शकणार नाही. याचे कारण म्हणजे बटाटा आणि कांद्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत असल्याचे त्या म्हणाल्या. संसदेने 23 सप्टेंबर या दिवशी आवश्यक खाद्य पदार्थ (दुरुस्ती) विधेयत पारित करत, धान्य, डाळ, तेलबिया, खाद्यतेल, कांदे आणि बटाटा अशा पदार्थांना आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते.