इरफान खानच्या निधनानंतर पत्नी पहिल्यांदाच बोलली, म्हणाल्या – ‘माझी एकच तक्रार, त्यांनी मला बिघडवलं’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं बुधवारी (दि 29 एप्रिल) जगाचा निरोप घेतला. यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आणि कुटुंबाला यातून सावरण्यासाठी प्रार्थना केली. या सगळ्या नंतर आता इरफानची पत्नी सुतापा, मुलं बाबिल आणि आयान यांनी स्टेटमेंट जारी केलं आहे. यात चाहत्यांनी केलेल्या सपोर्टसोबतच इरफानच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. सुतापानं एक पोस्ट सोशलवर शेअर केली आहे.

सुतापां शेअर केलल्या या स्टेटमेंटध्ये म्हटलं आहे की, “मी कसं स्वत:ला एकटं मानू जेव्हा पूर्ण दुनिया माझ्या सोबत आहे. कोट्यावधी लोक दु:ख व्यक्त करत आहेत. मला सर्वांना सांगायचं आहे की, हे नुकसानं नाही तर हे मिळवणं आहे. गोष्टी मिळवणं आहे ज्या आपल्याला शिकवल्या गेल्या आहेत. आता याच गोष्टींवर अमल करण्याची वेळ आहे. मला त्या गोष्टींची भरपाई करायची आहे ज्या लोकांना अद्याप माहिती नाहीत.

यात पुढे लिहिलंय की, “माझी त्यांच्याबद्दल(इरफान) एकच तक्रार आहे की, त्यांनी आयुष्यभरासाठी मला बिघडवलं आहे. ते प्रत्येक गोष्टीत एक वेगळाच ताल बघायचे कोलाहल आणि अस्वस्थतेतही. म्हणून मी या तालावर गाणं आणि नृत्य करणं शिकले आहे. डॉक्टरांचा रिपोर्ट एखाद्या स्क्रिप्टसारखा होता ज्याला मला ठिक करू वाटत होतं. म्हणून त्यात काहीही डिटेल मिस नाही केली.”

सुतापा यांनी लहिलं की, “जेव्हा मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांकडून दिलेली शिकवण सांगायला सांगितली तेव्हा बाबिल म्हणाला, अनिश्चिततेच्या नृत्यापुढे नतमस्तक होणं शिका आणि ब्रम्हांडावर भरोसा ठेवा. आयन म्हणाला, आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. याला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.”