जपानमध्ये होणाऱ्या भेटीआधीच भारताच्या ‘या’ गोष्टीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘नाराज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जपानमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेवेळी भेट होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील भेट घेणार आहेत. यावेळी या तीन नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.

मात्र याआधीच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला आहे. आयात वस्तूंवर लावण्यात येणारा कर वाढवल्यामुळे अमेरिकेने भारताला इशारा दिला आहे. या भेटिअगोदर त्यांनी ट्विट करत या गोष्टीकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर होणाऱ्या भेटीत याविषयावर चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, मला आशा आहे कि, आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भारताकडून जो मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो त्यावर चर्चा होईल. भारताने खूप वर्ष अमेरिकेच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लावला आहे. मात्र यापुढे हे चालणार नाही. या बैठकीत यावर चर्चा होण्याची आशा व्यक्त करत त्यांनी या विषयावर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

कधी होईल भेट

जपानमधील ओसाका येथे २८ आणि २९ जून रोजी हि परिषद पार पडणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरच्या अनेक विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा होऊन अनेक विषयांवर मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जी-२० परिषदेत ट्रम्प ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, एच वन बी व्हिसा, इराणवरील निर्बंधांमुळे भारताची इंधन अडचण, दोन्ही देशांनी लादलेले वाढीव शुल्क आदी मुद्यांवर या दोघा नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद