‘त्याचे’ झटके मलाही बसले : सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकारणातील मोठ्या भूकंपाचे झटके मलाही सकाळी बसले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल. हे सरकार शेतकरी हिताचे काम करेल, असे खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी राजभवनात शपथविधी पार पडला. सकाळी ९.३० वाजता प्रवरानगर (ता.राहाता) येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे उपस्थित झाले होते. यावेळी विखे हे पत्रकारांशी बोलले.

यावेळी खा. विखे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे काम करेल यात शंका नाही. पाच वर्षे राज्यात स्थिर सरकार राहील. हे सरकार शेतकरी हिताचे काम करून दिलासा देण्याचे काम करेल.

Visit : Policenama.com