विराटला न सांगताच ‘RCB’ नं घेतला ‘हा’ मोठा ‘निर्णय’, कोहली म्हणाला ‘मी कप्तान, मला तर सांगा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची टी-२० लीग, इंडियन प्रीमियर लीगच्या स्टार्सने परिपूर्ण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी धक्कादायक निर्णय घेतला. आयपीएलमध्ये आरसीबीच्या कामगिरीने प्रत्येक वेळी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे धुरंदर खेळाडू असूनही टीम नेहमी फ्लॉप ठरत असते. बुधवारी टीमने आपल्या सोशल अकाऊंटवरून संघाचा लोगो हटवला, ज्याने चाहत्यांना आणि विराट कोहली ला देखील आश्चर्य वाटले. अचानकच आरसीबी च्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो गायब झाल्याने वेगवेगळ्या गोष्टींना वाचा फुटली आहे. अंदाज लावले जात आहेत की या सीजन मध्ये टीम काही नवीन खेळाडूंसोबत उतरणार आहे.
Posts disappear and the captain isn’t informed. 😨 @rcbtweets, let me know if you need any help.
— Virat Kohli (@imVkohli) February 13, 2020
विराट कोहलीला देखील सोशल अकाऊंटवरून लोगो हटविण्यात आल्याचे माहित नव्हते. जेव्हा त्याने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने याबद्दल संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने ट्विटरवर टीमला टॅग करत लिहिले की, पोस्ट हटवण्यात आली आणि कर्णधाराला कोणतीही माहिती दिली गेली नाही. जर तुम्हाला काही मदत हवी असल्यास तसे सांगावे.
Arey @rcbtweets, what googly is this? 🤔 Where did your profile pic and Instagram posts go? 😳
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 12, 2020
तसेच बुधवारी टीमचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने देखील ट्विटर वरून फोटो आणि लोगो गायब झाल्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले की, अरे ही काय गुगली आहे, आपले प्रोफाइल पिक्चर आणि इन्स्टाग्राम पोस्ट कुठे गायब झाले?
Arey @rcbtweets, what googly is this? 🤔 Where did your profile pic and Instagram posts go? 😳
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 12, 2020
एबी डिव्हिलिअर्स ने देखील या बाबतीत आश्चर्य व्यक्त केले असून त्याने देखील प्रश्न उपस्थित करत लिहिले की, आरसीबी च्या सोशल मीडिया अकाउंट ला काय झाले, मला अशी आशा आहे की हा फक्त एक रणनीतीक ब्रेक आहे.