नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केल्याने महाराष्ट्रातील लोकक्षोम लक्षात घेऊन अखेर आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तकही मागे घेत असल्याचे भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे.
या प्रकाराबाबत प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, देशभरात कालपासून लोकांमध्ये या पुस्तकामुळै नाराजी व्यक्त होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिले आहे. त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे, याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. कल्याणकारी राज्य त्यांनी चालवले. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोक करतात. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलने झाली. हे पुस्तक ज्यांनी लिहिले आहे, ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे़.हा मुद्दा इथे संपवावा, अशी विनंती प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
फेसबुक पेज लाईक करा –
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे