‘या’ कारणामुळं ‘मलायका-अर्जून’च्या लग्नाला होतोय ‘उशीर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. परंतु अद्याप हे रहस्य कायम आहे की हे दोघे लग्न करणार तरी कधी ? मलायका अरोरा लग्न करण्यास तयार असल्याचेही सांगितले जात आहे. पण अर्जुन कपूरमुळे हा उशीर होताना दिसत आहे. अर्जुन सध्या लग्नासाठी तयार होत नाहीये.

हे लग्न लवकरच व्हावे अशी अर्जुन कपूरच्या कुटुंबीयांची इच्छा आहे पण अर्जुन अजूनही तयार नाही. अर्जुनच्या म्हणण्यानुसार जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते लग्न करतील. एका मुलाखतीत अर्जुन कपूरने मलायकाशी असलेल्या आपल्या नात्याविषयी नमूद केले. तो म्हणाला होता, ‘मी गरजेपेक्षा जास्त मॅच्युर आहे, यामुळे बर्‍याच वेळा मलाही त्रास सहन करावा लागला. आता जर एवढा मोठा निर्णय घायचा आहे तर, सर्वकाही विचार केल्यानंतर घेतला जाईल. लवकर किंवा उशीरा देखील नाही योग्य वेळी तेव्हा सांगितले जाईल’

अर्जुन कपूर असंही म्हंटला आहे की, तो त्याचे रिलेशनशिप कोणापासूनच लपवत नाहीये. त्याला आयुष्यात सेटल व्हायचे आहे. त्याला लग्न करायचे आहे परंतु कधी आणि कुठे होईल या गोष्टी सांगणे कठीण आहे. मलायका आणि अर्जुनच्या लग्नाला उशीर होण्याचे कारण त्यांच्या व्यस्त प्रोजेक्टबद्दल देखील सांगितले जात आहे. यावर्षी अर्जुन कपूर २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटात काम करणार आहे. त्याला अभिनेत्री परिणीती चोप्राच्या विरुद्ध कास्ट करण्यात आले आहे. मलायका अरोराबद्दल बोलायचे गेले तर ती एका डान्स रियालिटी शो जज करणार आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये ती जजची भूमिका साकारणार आहे. गीता कपूर आणि टेरेंस लुईस हे जजच्या भूमिकेतही दिसणार आहेत.