चीन सरकारनं Air India च्या विमानांना हाँगकाँगसाठी घातली बंदी, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली वरून हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीन सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान हॉंगकॉंगला गेले नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणे देखील दिल्लीत आली नसल्याचे समजते. एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँगच्या विमानात 14 ऑगस्ट रोजी 11 कोविड -19 प्रकरणे समोर आली, त्यानंतर चीन सरकारने एअर इंडियाच्या हॉंगकॉंगसाठीच्या उड्डाणावर बंदी घातली.

एका अहवालात म्हटले आहे की, हॉंगकॉंगने एअर इंडियाच्या पुढील उड्डाण संचालनावर बंदी घातली आहे. कारण एअर इंडियावर अनेक कोरोना संक्रमित रुग्ण घेतल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्टला एअरलाइन्सने घोषित केले की, दिल्ली-हाँगकाँगची विमान कंपनी पुढे ढकलण्यात आली.

चीनच्या सरकारच्या या निर्णयाचा फटका भारतातील हजारो अडकलेल्या हाँगकाँगच्या प्रवाशांवर झाला आहे. प्रवाश्यांनी सोशल मीडियावर प्रवासाची योजना पुन्हा तयार करण्यास सांगितले. एअर इंडियाने प्रवाश्याच्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधामुळे एआय 310/315, दिल्ली-हाँगकाँग-दिल्ली उड्डाण 18 ऑगस्ट 2020 रोजी पुढे ढकलण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती लवकरच सामायिक केली जाईल. प्रवासी एअर इंडियाच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकतात.