सत्तेत ५० वर्षे राहण्याची कला केवळ शरद पवारांना
शरद पवार यांच्यावर टीका करताना शहा म्हणाले, ” सत्तेत ५० वर्षे राहण्याची कला केवळ शरद पवारांना आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ७० वर्षे सत्तेत असताना काय केलंत? याचा हिशेब महाराष्ट्राला द्या. तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्राचा विकास झाला की घसरण? असा सवाल अमित शहा यांनी केला. सहकार, शेती, उद्योग, दूध उत्पादन या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन होता. पण, पवार सत्तेत असताना राज्याचा नंबर घसरल्याची टीका यावेळी अमित शहा यांनी केली. यावेळी अमित शहा यांनी बारामती, पुणे, पश्चिम महाराष्ट्राला दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती देखील दिली. २०१४ मध्ये महादेव जानकारांना ३५ हजार मतं कमी पडली. त्यावेळी आम्ही कमळ चिन्ह न देण्याची चूक केली होती. पण, आता अशी चूक होणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
राहुल यांच्या गरिबी हटाव वरून हल्लाबोल
यावेळी पुढे बोलताना राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला ते म्हणाले , ” राहुल बाबा गरिबी हटाव म्हणून किती काळ लोकांना मूर्ख बनवणार? पुलवामामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचा बदला नरेंद्र मोदींनी घेतला. पण, बालाकोट एअर strike नंतर पाकिस्तान आणि राहुल कंपनीला दुःख झालं अशी टीका यावेळी अमित शहा यांनी केली.