‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीनं PM मोदींच्या ‘जनता कर्फ्यू’ची उडवली ‘खिल्ली’, म्हणाली – ‘बाल्कनीत टाळी वाजवा..’
पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी ( दि 19 मार्च 2020) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. त्यांनी देशाला रविवारी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्युचं अपील केलं आहे. त्यांनी केलल्या अपीलला सामान्यांसोबतच सर्व कलाकारांनीही समर्थन केलं. अभिनेत्री पूजा बेदीनंही ट्विट केलं होतं. पूजा बेदीचं आणखी एक ट्विट आहे जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिनं मोदींना काही सवाल केले आहेत.
India needs to figure out how to be well prepared (beyond banging pans) to deal with the economic fallout caused by the #CoronavirusOutbreakindia
Will @nsitharaman come up with solutions? Give people a plan? Measures? All other countries seem to have. Why not India? pic.twitter.com/qWpt0Ps8i7— Pooja Bedi (@poojabeditweets) March 20, 2020
पूजा बेदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, “भारताला (थाळी वाजवण्यादरम्यान) हे माहिती करून घेण्याची गरज आहे की, कोरोना व्हायरसमुळं होणाऱ्या आर्थिक घसरणीसोबत निपटण्यासाठी कसं तयार केलं जाणार आहे. नीर्मला सीतारमण यांनी यावर उपाय घेऊन यावं. लोकांसाठी योजना ? उपाय ? इतर देश करत आहे तर भारत का नाही ?”
Dearest @PMOIndia Thank you 4 your wonderful address 2 nation on measures being taken to combat the #CoronavirusOutbreakindia but dont you think events like this in Andhra that happened JUST COUPLE days ago & the upcoming Ram festival for lakhs 0f devotees Is in direct contrast? pic.twitter.com/Ic5n46ZqZA
— Pooja Bedi (@poojabeditweets) March 19, 2020
याआधीही पूजा बेदीनं ट्विट केलं होतं. तिनं म्हटलं होतं की, “प्रिय नरेंद्र मोदी, राष्ट्राला केलेल्या या छान अशा संबाोधनासाठी धन्यावाद. कोरोनासाठी काय पाऊल टाकावं हे तुम्ही भाराताल सांगितलंत. तुम्हाला नाही वाटत की काही दिवसांपूर्वीचा आंध्र प्रदेशातील कार्यक्रम आणि येणारा लाखो श्रद्धाळूंचा राम उत्सव जे तुम्ही म्हणताय त्याच्या एकदम उलट आहे?” असं म्हणत पूजानं पीएम मोदींना सवाल केला होता.