नाशिकमधील ‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या 25 वर, 34 जण जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – बस आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती बसमधील प्रवासी आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

यात अ‍ॅपे रिक्षातील ९ आणि बसमधील ४८ प्रवासी अडकले होते. मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात होताच समोरील हॉटेलवर थांबलेले देवळा रहिवासी असलेले शिक्षक संजय सदिशिव देवरे व शेतमालक गणेश देवरे यांनी बसमधील जखमींना तातडीने बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासह पोलीस यंत्रणा व रुग्ण वाहिका तातडीने घटना स्थळी हजर झाल्या. आमदारांनीही स्थानिकांची मदत घेऊन मृतांना बाहेर काढण्यास मदत केली.

अपघातानंतर प्रवाशांनी आक्रोश सुरू केला. तो आरडाओरडा ऐकून आसपासचे शेतकरी मदतीसाठी धावले, परंतु विहिरीत उतरण्यासाठी जागाच नव्हती. विहिरीत सुमारे २५ ते ३० फूट पाणी होते. त्यात रिक्षा आणि त्यावर बस अशी स्थिती होती. काही स्थानिकांनी बसची पाठीमागची काच फोडली आणि आतमध्ये शिरून जखमी प्रवाशांना एकेक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी बसमधून ८ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले.

फेसबुक पेज लाईक करा