काँग्रेसच्या दबावामुळं शिवसेनेच्या भूमिकेत बदल ?, फडणवीसांचा CM ठाकरेंना ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का ?” असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान काल लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास करण्यात आलं. यासाठी 8 तासांची वादळी चर्चा झाली. यावेळी लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता हवी आहे. स्पष्टता आल्यानंतर आपण आपली भूमिका मांडू. जर सरकारनं याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मात्र राज्यसभेत आम्ही या विधेयकाला विरोध करू.”

याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का असं त्यांनी म्हटलं. याशिवाय कोणाच्याही दबावाखाली न येण्याची शिवसेनेची भूमिका असून त्यात कोणताही बदल होणार नाही अशी अपेक्षा करतो असेही फडणवीस म्हणाले.

Visit : Policenama.com

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे