रॅलीदरम्यान भाजपा नेत्याने ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपल्याचा केला दावा
पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही पश्चिम बंगालमधील भाजप नेत्याने रॅलीदरम्यान अजब दावा केला आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याचा दावा नेत्याकडून करण्यात आला आहे. हुगळी या ठिकाणी आयोजित रॅलीला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे.
From Dhaniakhali (Hooghly zela), while addressing a public meeting this afternoon. pic.twitter.com/Oa7AlnmsVn
— Dilip Ghosh (@DilipGhoshBJP) September 9, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपल्याची घोषणा पश्चिम बंगाल बीजेपीचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. काही लोकांना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखे वाटत असेल. परंतू ते कोरोनामुळे नाही तर भाजपच्या भीतीने आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाउन लागू करत आहेत. भाजपने बैठका आणि रॅलींचे आयोजन करू नये यासाठी सवे काही केले जात असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. आम्ही ज्या कोणत्याही ठिकाणी जातो तेथील स्थिती आपणहूनच रॅलीमध्ये बदलते आहे. बुधवारी पश्चिम बंगालमध्येही 3 हजार 107 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.