ठाकरे सरकार अपयशी ठरल्यानं त्यांना नारळ द्या, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : नारायण राणे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हातळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी उपयायोजना करू शकत नाही. या सरकारमध्ये तेवढी क्षमता नाही.
Former Maharashtra CM and BJP leader Narayan Rane met
Governor Bhagat Singh Koshyari today and demanded that President's Rule be imposed in the state. pic.twitter.com/3Ava55SMbh— ANI (@ANI) May 25, 2020
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा.
ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. @maha_governor @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/poxG9iA7Tb— Narayan Rane (@MeNarayanRane) May 25, 2020
राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 25, 2020
राज्यात आतापर्यंत हजारापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. कोरोना संकट हातळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना परिस्थिती हाताळता येत नसल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. एका तोंडानं राज्य सरकार केंद्राचं कौतुक करतं. दुसऱ्या तोंडानं टीका करतं. हे कोणत्या प्रकराचं राजकारण हे समजण्यापलिकडे आहे.
या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावेत, पोलिसांना कसे सुरक्षित ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल, असे मत त्यांनी व्यक्त केलं.