भारतानं कडक केले FDI चे नियम तर चीननं दिली मेडिकलचं सप्लाय बंद करण्याची ‘धमकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने थेट परकीय गुंतवणूकीच्या (एफडीआय) नियमांना कठोर केल्यामुळे शेजारील चीन नाराज झाला आहे. भारताने हे पाऊल उचलले होते की, कोरोना संकटाचा फायदा घेऊन चीनने कमजोर भारतीय कंपन्यांचा ताबा घेऊ नये. भारतातील FDI च्या नियमात बदल करण्यास चीनने आक्षेप घेत म्हटले की हा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वविरूद्ध आहे.

एफडीआयच्या नव्या नियमांनुसार आता भारताच्या सीमेशी जोडलेल्या कोणत्याही देशातील नागरिकांना किंवा कंपन्यांना गुंतवणूकीपूर्वी सरकारी मान्यता घ्यावी लागेल. आतापर्यंत फक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातील नागरिक आणि कंपन्यांना मंजुरीची आवश्यकता होती. भारताच्या आधी इतर अनेक देशांनी चिनी कंपन्यांना थांबवण्यासाठी एफडीआय नियम कठोर केले आहेत.

एफडीआयच्या नियमात बदल झाल्यानंतर नवी दिल्लीतील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, आम्हाला आशा आहे की भारत आपल्या भेदभाववादी धोरणात संशोधन करेल आणि वेगवेगळ्या देशांच्या गुंतवणूकीसाठी समान नियम बनवेल. यासह भारत आपल्या इथे मुक्त, पारदर्शक आणि स्पर्धात्मक व्यवसायाचे वातावरण तयार करेल.

दरम्यान, चिनी सरकारच्या एका वृत्तपत्राने लिहिले आहे ज्यामध्ये भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यांनी लिहिले की, चीनच्या कर्मचार्‍यांचे आभार, देश आता स्वतःसाठी आणि जगासाठी वैद्यकीय पुरवठा करण्यास सक्षम झाला आहे. मात्र भारत सरकारने या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे आणि परकीय गुंतवणूकीचे नियम कठोर करण्यासाठी कोरोना महामारीचे कारण दिले आहे. वैद्यकीय पुरवठ्यासाठी भारत मुख्यतः चीनवर अवलंबून आहे.

फार्मेक्सिल डेटानुसार, भारत आपल्या औषधांसाठी कच्चा माल बहुतेक चीनकडून खरेदी करतो. चीनकडून कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भारताच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती भारतीय कंपन्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.

त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे, भारताला याबाबत चिंता आहे कि कोरोना व्हायरसच्या संकटाचा फायदा घेत चीन भारतीय कंपन्यांना ताब्यात घेऊ शकते आणि काही भारतीय क्षेत्रांवर नियंत्रण स्थापित करू शकते, पण ही भीती पूर्णपणे अनावश्यक आहे. भारत सरकारचे हे पाऊल पर्यायी होते कारण आधीची धोरणे केवळ भारतीय कंपनीला ताब्यात घेण्यापासून वाचवण्यात सक्षम होती. चीनी गुंतवणूकीवर अशा प्रकारचे निर्बंध भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी घातक ठरतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. लवकरच या नव्या धोरणाचा फटका भारतातील चिनी गुंतवणूकीवर दिसून येईल. तसेच चीनमधील भारतीय गुंतवणूकीवरही परिणाम होणार आहे.

त्यांनी असा दावा केला आहे की जरी या निर्णयानंतर भारतासाठी दुसरे दरवाजे उघडले असले आणि आपला व्यवसाय पुन्हा स्थानांतरित करण्याची संधी शोधत असलेल्या जपानी आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना संधी मिळाली, तरी भारताच्या उत्पादन क्षेत्रात चीनचे स्थान आणखी कोणी घेऊ शकणार नाही.

भारत पुढील उत्पादन केंद्र बनण्याची शक्यता आहे, पण सध्याच्या आर्थिक संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. उत्पादन केंद्र बनण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी भारत खूप वेळ घेईल, असे म्हटले जाऊ शकते. अशा परिस्थितीत भारताने चीनबरोबर सहकार्य वाढवले पाहिजे.

पुढे त्यांनी असेही लिहिले आहे की भारताच्या बंद दरवाजामुळे चिनी कंपन्यांसाठी संधीची दुसरी खिडकीही उघडता येऊ शकते. अनेक चिनी कंपन्यांना महामारी संपल्यानंतर परदेशात आपला विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी ते दक्षिण-पूर्व आशियाई देशांकडे वळू शकतात. भारत चिनी कंपन्यांसाठी असुरक्षित असल्याचे सिद्ध केले तर ते चीनकडून मदत घेण्यास अधिक इच्छुक असलेल्या दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये त्यांचा व्यवसाय वाढवतील असे त्यांनी लिहिले आहे.