Coronavirus : 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’चं विराटकडून ‘समर्थन’ तर हरभजननं दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसर्‍यांदा मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूने दाखवून दिले की देशावर ज्यावेळी कोणतेही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. कोरोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल केले आहे. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडडाउन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तिंनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी सार्‍यांना विनंती करतो की करोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया, असे ट्विट भारताचा कर्णधार विराट कोहली याने केले.जैसे कि हमारे माननीय प्रधान मंत्री, मोदीजी ने अभी घोषणा की, पूरा देश अगले 21 दिनों के लिए आज मध्यरात्रि से पूरे लॉकडाऊन में जा रहा है। मेरा अनुरोध एक ही रहेगा, कृपया घर पर रह।
पुढचे 21 दिवस हे भारतासाठी आणि आपल्या जीवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नागरिक, मुलगा, मुलगी, आई, वडिल, पती, पत्नी, भाऊ, बहिण अशा सगळ्या नात्यांनी आपली जबाबदारी ओळखा. कारण करोना रोखण्याचा हा एकमेव उपाय आहे, अशा शब्दात फिरकीपटू हरभजनने मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सार्‍यांनी आपापल्या घरात थांबा. तुम्ही तुमच्या वाटची जबाबदारी पार पाडा. करोनाला पळवून लावण्यासाठी योग्य खबरदारी घ्या, असा संदेश चेतेश्वर पुजाराने दिला. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मोदी यांच्या घोषणेआधीच देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होते