Coronavirus : ‘कोरोना’विरूध्दच्या लढाईसाठी TATA समूहाकडून तब्बल 500 कोटींची मदत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून अनेकवेळा योगदान दिले गेले आहे. मागील 70 वर्षातील सर्वात मोठं संकट सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिले जात आहे. या संकटासाठी अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे आणि घेत आहेत. आपल्या परीने जेवढी शक्य असेल तेवढी मदत या संस्थांकडून, व्यक्तींकडून केली जात आहे.
The COVID 19 crisis is one of the toughest challenges we will face as a race. The Tata Trusts and the Tata group companies have in the past risen to the needs of the nation. At this moment, the need of the hour is greater than any other time. pic.twitter.com/y6jzHxUafM
— Ratan N. Tata (@RNTata2000) March 28, 2020
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी शिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टकडून 50 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट कडून 5 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबत देशातील अनेक उद्योजक कामगारांच्या वेतनात कपात करणार नसल्याचे सांगत या लढाईत आपले योगदान देत आहेत. आता टाटा ग्रुपने देखील या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. कोरोनाच्या लढाईसाठी टाटा ग्रुपकडून 500 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वी देशावर आलेल्या संकटाच्यावेळी आपलं योगदान दिलं आहे. आता देशात कोरोनाचे संकट आले असून या संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ग्रुपने आपले योगदान दिले आहे. सध्याच्या काळाची गरज आणि वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदीसाठी 500 कोटी रुपये देण्यात येत आहे. असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे.
हीच ती वेळ
सध्या देशाला आणि जगाला कोरोना व्हायरसने घेरले आहे. आपण कृती करण्याची हीच वेळ आहे. कोरोनाविरुद्ध मानवजातीची रेस सुरु झाली आहे. त्यामुळे या रेसमध्ये सहभागी होत, टाटा ग्रुपकडून कोरोनाच्या लढाईसाठी वैद्यकीय साहीत्य अन् अत्यावश्यक गरजांसाठी 500 कोटी रुपये जाहीर करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हीच ती वेळ असे म्हणत.. एकप्रकारे इतरही उद्योजकांना टाटा यांनी देशसेवेत सहभागी होण्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.