दिलासादायक ! अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकार मोठी घोषणा करणार

ADV

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रभावित अर्थव्यवस्थेला पुन्हा जिवंत करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणखी एक मोठे आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन संपण्यापूर्वी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.  हवाई उड्डान , किरकोळ व्यापार, पर्यटन, दौरा आणि प्रवास, हॉटेल उद्योग वगळता लघु व मध्यम उद्योगांवर सरकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी उद्योग मंडळाने सीआयआय आणि असोचॅमच्या माध्यमातून सरकारकडे मोठे पॅकेज मागितले आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी किमान 8 लाख कोटी रुपयांची आवशक्यता आहे . त्याचबरोबर असोचॅमने 15 ते 20 लाख कोटींच्या पॅकेजची मागणी केली आहे. माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनीही आरबीआयकडून सरकारला पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे असे सुचविले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या नव्या अ‍ॅक्शन प्लॅनची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने आर्थिक व्यवहार सचिव अतनू चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगांना होणार्‍या नुकसानी व्यतिरिक्त बेरोजगारांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी अधिकार्‍यांची एक समिती स्थापन केली आहे .

मोदी सरकारने गेल्या आठवड्यात समाजातील गरीब आणि वंचित घटकांना मोफत अन्न आणि रोख हस्तांतरणाच्या स्वरूपात 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. लॉकडाऊन होण्यापूर्वी सरकारने उद्योगांना तीन लाख कोटींचे पॅकेज दिले होते. परंतु लॉकडाऊनमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे आर्थिक तोटा वाढला आहे. त्यामुळे आता दुसर्‍या पँकेज च्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.