मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 11 लोकांचा मृत्यू झालाय व मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. पश्चिम महाराष्ट्राच्या पुरपरिस्थितीतही मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. मुख्यमंत्र्यांना जनतेचं घेणं-देणं नाही फक्त निवडणूक जिंकायची आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘राज्यातील जनतेने या सरकारचे काय घोडे मारले आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकदा सांगावे. पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 11 लोकांचा मृत्यू झाला तरी मुख्यमंत्री जागावाटपासाठी दिल्लीत बसलेत. पश्चिम महाराष्ट्राच्या पुरपरिस्थितीतही मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का? मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का?’
पुण्यातील काही भागांत बुधवारी रात्री पावसानं थैमान घातले. अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. वस्त्यांमध्येही पाणी घुसले होते. पुरानं आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातील या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय