…म्हणून मला नाईलाजानं देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) माझं नेतृत्व करत होते. त्यावेळी “माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला तसेच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले त्यावेळी त्यांनी माझा दोषही स्वीकारला पाहिजे होता. त्यांना सभागृहात काही बोलता आले नाही तसेच ते सभागृहाच्या बाहेर देखील काही बोलले नाही त्यामुळे मला नाईलाजास्तव देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांचं नाव घ्यावं लागलं” अशी अशी खदखद भाजपचे ( BJP) नाराज नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्याकडुन व्यक्त करण्यात आली होती. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत प्रश्व विचारण्यात आला. ‘एकनाथ खडसे यांनी मला विलन ( Villain) ठरवलं’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तेव्हा ‘फडणवीसांमुळेच पक्ष सोडावा लागला’, अशी भूमिका नाथाभाऊयांच्याकडुन मांडण्यात आली. तसेच खडसे पुढे म्हणाले “फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये?” असा सवाल देखील खडसेंकडुन करण्यात आला.

खडसे काय काय म्हणाले

“माझं भाषण मुक्ताईनगरला ( Muktainagar) सुरु होतं. भाषणात मी काहीच अश्लील बोललो नाही. माझ्या शेतातील आंब्याचा विषय होता. यावरुन अंजली दमानिया ( Anjali Damaniya) यांनी गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक विनयभंगाचा गुन्हा करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते. कुणी अमेरिकेत राहिलं आणि मी मुक्ताईनगरला राहिलो तर तसे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यांनी गोंधळ केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला फोन करुन गुन्हा ( Crime) नोंद करा, असे आदेश दिले”, असे खडसे म्हणाले

“मला ज्यावेळेला समजलं तेव्हा मी देवेंद्र यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांच्याकडून बाई गोंधळ घालत होती, अशी कारणं देण्यात आली. आयुष्यभर ज्यांनी चारित्र्य जपलं अशा व्यक्तीवर अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणं, अप्रत्यक्ष त्याला मदत करणं चुकीचं आहे. या गोष्टी मी सहज बोलत नाही तर पुराव्यानिशी बोलतो. मला फार मानसिक यातना झाल्या”, असे एकनाथ खडसे म्हणाले.

“विनयभंगाचा खटला खारीज झाला. मी एकटा गुन्हेगार आहे, असं समजून मला राजीनामा द्यायला भाग पाडले. मंत्रिमंडळात दहा-बारा लोकांवर आक्षेप घेण्यात आले त्यांच्या चौकश्या देखील झाल्या. एका मंत्र्यावर तर सीबीआयची ( CBI) तक्रार होती तरी त्याला क्लीन चीट, पण एकनाथ खडसेंना क्लीन चीट (Clean Cheat) नाही त्याला कारण काय?”, असा सवाल देखील खडसेंकडून विचारण्यात आला.

“मी वारंवार पक्षाच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी केल्या हे देवेंद्र फडणवीसांना माहित होते मी संघटन मंत्र्यांशी देखील चर्चा केली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या देखील कानावर या गोष्टी घातल्या”असे देखील खडसे म्हणाले.

“या चार वर्षांमध्ये मी सगळ्यांकडे तक्रार केली माझा दोष सांगा असे देखील सांगितलं. पण देवेंद्र फडणवीसांचा निर्णयचं अंतिम होता. पुढे फडणवीस सांगतील तेच पुढे होत गेलं. ते जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी पक्की भावना झाली. म्हणून मी व्यक्तीगत कारणामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला” असे एकनाथ खडसे यांच्याकडून पक्ष सोडताना स्पष्ट करण्यात आले आहे.