पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजगडाच्या अति दुर्गम बालेकिल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या विकास बिरुदेव गावडे (वय 45, रा.इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या अभियंत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी (दि. 16) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजगडाच्या अतिदुर्गम बालेकिल्ल्याच्या दरवाजात घडली.
अतिदुर्गम बालेकिल्ल्यावर खडकातील पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावर कोसळले. ते तेथेच पडले होते. मात्र अर्धा पाऊण तासाने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती वेल्हा येथील सरकारी रुग्णवाहीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोरसे यांनी दिली आहे. मयत विकास गावडे हे वाळवा तालुका इंजिनीअर असोनिएशनचे अध्यक्ष आहेत.
विकास गावडे यांच्यासमवेत इस्लामपूर येथील 35 जण आज सकाळी राजगडावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोंखडी शिडीवर त्यांना ठेवून खाली आणले.
घटनेची माहिती मिळताच वेल्हा पोलीस ठाण्याचे अभय साळुंखे, राजगड पोलीस ठाण्याचे गणेश लडकत यांनी गुंजवणे पाल येथील होमगार्ड, कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या पोलीस पथकाने सरकारी रुग्णवाहीकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री भोर येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी वेल्हा पोलिस तपास करत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –