नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतात रेल्वे उशीरा येणे सामान्य मानले जाते. पण या दोषाला दूर करून रेल्वेने मोठी कामगिरी दाखविली आहे. 1 जुलै रोजी देशात धावणाऱ्या 201 गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर पोहोचल्या. रेल्वेचे म्हणणे आहे की, भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच सर्व गाड्या वेळेवर शंभर टक्के धावल्या गेल्या आहेत आणि वेळेवर त्यांच्या गंतव्यापर्यंत पोहोचल्या. यापूर्वी 23/6/20 रोजी फक्त एकाच ट्रेनला उशीर झाला होता. ज्यामुळे पंचुल्टी 99.54 टक्के नोंदली गेली होती.
First time ever in the history of Indian Railways, 100% punctuality of trains acheived, with all trains on time. Previous best was 99.54% on 23.06.2020 with one train getting delayed: Indian Railways. pic.twitter.com/LSbSMyQWYV
— ANI (@ANI) July 2, 2020
भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की, रेल्वेच्या इतिहासात प्रथमच 100 टक्के वक्तशीरपणा पाळला गेला आहे. सर्व गाड्या वेळेवर सुटल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड 99.54 टक्के होता कारण 23 जून 2020 रोजी एका ट्रेनला उशीर झाला होता. आयआरसीटीसी प्रवाशांना त्यांच्या खासगी गाड्यांच्या विलंबाची भरपाई देते – तेजस एक्स्प्रेसला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई मिळते. प्रवाशांना आंशिक रिफंड अर्थात ट्रेन उशिरा आल्यास आंशिक रिफंड दिला जातो.
जर ट्रेन 1 तासापेक्षा जास्त उशिरा आली तर प्रवाशांना 100 रुपये आणि दोन तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपयांचा रिफंड दिला जातो. तथापि, ही सुविधा केवळ खासगी गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. ही सुविधा रेल्वेने चालविणार्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाही.