चॅट शोमधील ‘त्या’ वादानंतर ‘हार्दिक-राहुल’नं घेतला होता ब्रेक ! पंड्या म्हणाला – ‘आता शांत झालोय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या आणि बॅट्समन केएल राहुल यांच्यासाठी 2019 ची सुरुवात अजिबात खास नव्हती. दोघंही करण जोहरच्या चॅट शोमध्ये आले होते. कॉफी विद करणमध्ये महिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आता त्या दिवसांची आठवण काढत हार्दिकनं यावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

‘राहुल भावासारखा आहे’
केएल राहुलबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, “राहुल माझ्यासाठी भावासारखा आहे. आम्ही दोघांनी एकमेकांचा आनंद साजरा केला आणि खराब दिवसही पाहिले आहेत. त्यात काहीच बदल झाला नाही. कॉफी विद करणनंतर तो शांत झाला. आमची मैत्री आधी सारखीच आहे. या घटनेनंतर इतका दबाव होता की आम्ही एक महिन्याचा ब्रेक घेतला होता.”

‘कायमच चूक मान्य केली आहे’
कॉफी विद करणच्या त्या किस्स्यानंतर आयुष्यात जे काही बदल झाले त्यावर बोलताना हार्दिक म्हणतो, मी माझ्या आयुष्यात चुका केल्या आहेत. चांगली बात अशी आहे की, मी त्या चुका कायम स्विकार केल्या आहेत.

हार्दिकनं या गोष्टीवर मात्र नाराजी व्यक्त केली की, या घटनेनंतर लोकांनी त्याच्या वडिलांना शिव्या देत अपशब्द वापरले.