‘नैसर्गिक’ मृत्यूनंतर पोलिसांच्या वारसांना मिळणार ‘अर्थसहाय्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाख पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्य़रत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत पोलीस महासंचालक विशेष सहय्यता निधीतून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही मदत तातडीने दिली जाणार आहे.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच आदेश दिले आहेत. पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जाच्या अंमलदारांच्या वरसांना ही मदत मिळणार आहे. मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, या व्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल. याची अंमलबजावी तातडीने करण्याचे आदेश पोलीस महासांचालकांनी दिले आहेत.

विविध घटनांमध्ये पोलिसांचा ऑनड्युटी मृत्यू होतो. त्यावेळी त्यांना शासनाकडून अनुदान, विमा तसेच पोलीस कल्याण निधीतून वारसांनी मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून मदत केली जाते मात्र, ही मदत अत्यल्प असून यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. मागील महिन्यात महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकित जायस्वाल यांनी पोलिसाच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब आर्थिक विवेचनेत असते. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असून त्यांच्या वारसांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासन, विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फेअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्राह अनुदानही निर्धारीत मुदतीत द्यावी, अशा सूचना महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना केल्या आहेत.

मृत्युमुखी अंमलादराच्या कायदेशीर वारसाला हा निधी मिळण्यासाठी संबंधित पोलिसाचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्याच्या कायदेशीर वारदारांच्या नोंदीबाबतचे अभिलेख, घटक प्रमुखांच्या बँक खात्याचा तपशिल, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावी लागेल. त्यानंतर संबंधित वारसाला तातडीने हा निधी दिला जाईल.

तातडीने अंमलबजावणी होणार
मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. मात्र, नैसगर्गिकपणे निधन पावणाऱ्यांच्या वारसाला निर्धारित स्वरुपाशिवाय असा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी 50 हजार रुपये अनुदान दिल्याने त्यांना बिकट प्रसंगी थोडा फार हातभार लागेल. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/