भावाचा मृत्यूनंतर देखील प्रियंका गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात राहिल्या CO अर्चना सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज शनिवारी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन मोदी सरकारविरोधात निषेध नोंदवत होत्या. या काळात पोलिसांनी थांबविल्यानंतर प्रियंका गांधी यांनी लखनौच्या मॉडर्न कंट्रोल रूमच्या आयपीएस अधिकारी आणि सीईओ डॉ. अर्चना सिंह यांच्यावर गळा आवळून त्यांना ढकलून दिल्याचा आरोप केला. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा डॉ. अर्चना सिंह प्रियंका गांधी यांच्या ताफ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत असताना त्यांच्या भावाच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली पण त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही.

प्रियंका गांधी यांच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची सुरक्षा व्यवस्था हाताळणार्‍या आयपीएस अधिकारी डॉ. अर्चना यांच्या भावाचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची बातमी मिळाली. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्या थोड्या वेळासाठी दुःखी झाल्या परंतु प्रियंका गांधींचा कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही आणि कोणालाही याबाबत काहीही सांगितले नाही.

प्रियांका गांधींच्या संरक्षणादरम्यान डॉ. अर्चना यांनी प्रियंका यांचा गळा दाबल्याच्या आरोपावरून चर्चेत आल्या, पण तातडीने हे स्पष्ट झाले की असे काही घडलेले नाही आणि प्रियंका गांधी यांच्या वतीने हा खोटा आरोप केला जात आहे. प्रियंका गांधींच्या आरोपामुळे डॉ. अर्चना खूप दुखावल्या गेल्या आहेत.

प्रियंका गांधी गेल्यानंतर सीओ डॉ. अर्चना यांनी त्यांच्या चुलतभावाचे निधन झाल्याची माहिती एसएसपी यांना दिली. ज्या भावाबरोबर त्या लहानपणी खेळत खेळत मोठ्या झाल्या, त्यांचे दिल्ली रुग्णालयात कावीळ झाल्याने निधन झाले. यापूर्वी अर्चना यांनी आपल्या भावाला भेटण्यासाठी रजा मागितली होती, परंतु त्यांना सुट्टी मिळाली नव्हती.

आपल्या भावाचे निधन झाल्यानंतर, डॉ. अर्चना यांनी लखनऊच्या एसएसपी कलानिधी नैथानींकडून त्यांच्या भावाच्या अंत्यविधीसाठी बिहार जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/