पीएमओ ऑफिस नव्हे हे तर प्रचार मंत्र्यांचे ऑफिस : राहूल गांधींची टिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पीएमओ ऑफिस हे ऑफिस न राहता ते आता प्रचार मंत्र्यांचे ऑफिस झाले आहेत, अशी टिका कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मणिपूर राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

राहूल गांधी बोलतांना म्हणाले की, देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती ही वेगवेळी आहे. ज्याचा आदर आपण केला पाहिजे, देशातील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण देशात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक हे आपले विचार लादण्याचे काम करत आहेत, जेव्हा कोणी यांच्या विरोधात आंदोलन करत असेल तेव्हा यांचा खरा चेहरा समोर येतो अशी टीका राहूल गांधी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत प्रश्न उपस्थित करत राहूल गांधी  म्हटले की, पंतप्रधानांनी  घेतलेल्या शिक्षणाविषयी आम्ही आरटीआयद्वारे माहिती मागीतली होती परंतू त्याचे उत्तर मात्र आम्हाला मिळाले नाही. ते कोणत्या महाविद्यालयात शिकले हे कोणालाही माहित नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून, ती कमी करण्याचे काम विविध क्षेत्रातील उद्योगांना चालना देऊन आम्ही  ती करु. असा दावा राहूल गांधी यांनी केला आहे. या अगोदर देखील राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपध्दतीवर कडाडून टिका केली आहे. मोदी हे आश्वासने देण्यात माहीर आहेत. २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी अनेक आश्वासने दिली परंतू त्यातील एकाही आश्वासंनाची पूर्तता केली नाही.या सरकारने राफेल खरेदीत मोठा घोटाळा केला आहे,तसेच फ्रान्सच्या अध्यक्षांनी राफेल कराराचे खरे वास्तव देखील उघड केले आहे. त्यामुळे हे सरकार चोर असून ते खोटारडे आहे, अशी टिका राहूल गांधी यांनी केली.