Maharashtra cabinet reshuffle | राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet reshuffle । मागील काही दिवसापूर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. याचबरोबर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे (Maharashtra Cabinet reshuffle) वारे लागत आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. आता पहिल्यांदाच याचे संकेत मिळत आहेत. त्यातच महत्वाचे म्हणजे विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) निवडी होणार आहे. यासाठी हे सरकार त्या तयारीत लागलं असल्याची चर्चा आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ बदलाबाबत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) हे तिन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती समजते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची एक-एक मंत्रीपदाची जागा रिक्त आहे. यामुळे दोन्ही पक्ष मंत्रीपदाच्या जागा भरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि शिवसेनेचे संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्यामुळे हे दोन्ही मंत्रीपद रिक्त झाली आहेत. म्हणून दोन्ही पदे भरण्यास दोन्ही पक्ष तयारीत आहेत.
काँग्रेसच्या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू?
काँग्रेस (Congress) पक्ष देखील त्यांच्या काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचं समजते.
काँग्रेसच्या 2 मंत्र्यांच्या कामगिरीबाबत पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (K. C. Padvi) आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांचा समावेश असल्याची चर्चा सुरु आहे,
म्हणून त्यांच्या जागी 2 नव्या चेहर्यांना संधी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. के. सी. पाडवी यांच्या जागी आदिवासी चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
अस्लम शेख यांच्या जागी मुस्लिम चेहरा दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
Web Title :- Maharashtra cabinet reshuffle | sub titlemaharashtra cabinet reshuffle congress two minsters in danger zone ncp shivsena
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे
Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही