Maharashtra Politics News | ‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आणि खातेवाटपावरुन शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics News) मात्र, यातच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार दोघेही टेरर नेते आहेत, त्यांचे किती काळ जमते ते पाहू, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

महाराष्ट्रातील राजकारणावर (Maharashtra Politics News) बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी तीन पक्षांचं सरकार होतं त्याला रिक्षा म्हणत होते. त्या रिक्षाने संकटावर मात करत अडीच वर्षे सरकार चालवले. आता त्यांच्या तीन चाकी रिक्षा म्हणायचं की घसरगाडी म्हणायचं? त्यांच्या तीन चाकातील पहिला टायर कधी पंकच होतो ते आता लोक बघणार आहे. सत्तेसाठी एवढा हावरटपणा महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, जो आता राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे.

 

मतदानाला जायची इच्छा राहिली नाही

मतदानाला जायची इच्छा राहिली नाही, अशी लोकांची भावना आहे. यावरुन राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. विकासाच्या नावावर सरकार आणायचं आणि विकासकामं ठप्प पाडायची. सत्तेच्या मलिदेसाठी भांडायचं असा लज्जास्पद प्रकार जनता बघत आहे. अशा राजकारण्यांची कशी जिरवायची अशा संधीची वाट लोक बघत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. अर्थखाते अजित पवारांकडे गेले तर ज्या कारणामुळे हे लोक सत्तेतून बाहेर पडले आणि तेच कारण घेऊन सत्तेच्या बाहेर पडतील का याची जनता वाट पाहात आहे, अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली.

 

फडणवीस आणि पवार टेरर नेते

देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार दोन्ही नेते टेरर (Terror Leaders) आहेत,
त्यांचे किती काळ जमते ते पाहू. त्यांना दोन-तीन मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा आहे.
पुढचे कसे शांत होतील तेही पाहू. खरंतर 115 लोकांना (भाजप) 33 टक्के वाटा आणि 35 वाल्यांनाही (राष्ट्रवादी) 33 टक्के वाटा, हे सत्तेचे समीकरण जुळवून सत्तेतून जेवढे मिळेल तेवढे आपल्या घशात घालण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दात वडेट्टीवर यांनी हल्लाबोल केला.

 

डबे ठेऊ नका इंजिनच लावा

तीन इंजिनमुळे सरकार मजबूत होऊ शकतं किंवा बिघाडीही होऊ शकते
असं आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) म्हणाले होते.
यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, डबल इंजिन ठीक आहे. आता तिसरं इंजिन,
पुन्हा कोणीतरी म्हणे चौथं इंजिन. डबे ठेऊ नका इंजिनच लावा. बिना डब्याचे इंजिन असलेले सरकार.
ज्यात लोकांना स्थान नाही फक्त सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्थान आणि चालवणाऱ्यांची मजा,
मागे पब्लिक नाही, डबे नाही अशी अवस्था या लोकांची झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title : Maharashtra Politics News | devendra fadnavis and ajit pawar are terror leaders let s see how long they
last says congress leader vijay wadettiwar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा