‘कोरोना’वरची ‘लस’ आणि ठाकरे सरकार पाडण्याचा ‘डोस’ विरोधकांना सापडायचाय !
पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक चिंतेत असताना राज्य सरकारमध्ये राजकीय खलबते चालली असल्याचे दिसून आले आहे. शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीतील महत्वाचे दुवा असलेले संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला पुष्टी मिळाली आहे. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबतच्या अफवा निव्वळ पोटदुखी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है.
विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे..
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील .
Boomerang…
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
कोरोनाच्या काळात अनेक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने चर्चेला ऊत आला आहे. त्यानंतर काल शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असे ट्वीट राउत यांनी केले आहे. ’कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. बुमरँग…’ असे ट्वीटही त्यांनी केले आहे.
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र !!@PawarSpeaks @CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020