मान्सून : मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबई शहर आणि उपनगरमध्ये पावसाने विश्रांती घेतली असताना सोमवारी (3 ऑगस्ट) मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

येत्या 4, 5 आणि 6 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी तुरळक तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. औरंगाबाद, जालना बीड, परभणी, हिंगोली, नांदेडसह लगतच्या जिल्ह्यांत तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत संपूर्ण दिवस पावसाने विश्रांती घेतली तर कुठे तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.