अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा येथे आईने दोन मुलांसह विहीरीत ऊडी मारून आत्महत्या केली. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव माथा गावाअंतर्गत कारेवाडी असून याठिकाणी राणी चिमा लहांगे ही महीला आपल्या कुटूंबासोबत राहात होती. आज दुपारी तिने आपल्या दोन मुलांसह विहीरीत ऊडी मारून आत्महत्या केली. या महिलेच्या आत्महत्यांचे कारण अद्यापही समजले नाही. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने तिन्ही मृतदेह विहीरीतून बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी संगमनेरातील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
दोन मुलांसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमकी कशामुळे आत्महत्या केली, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
Visit : Policenama.com
- बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी