TIFR चा अहवाल : … तर नोव्हेंबरपर्यंत मुंबईत ‘लोकल’, ‘कार्यालय’ अन् ‘शाळा’ सुरू होऊ शकतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात गेल्या मार्च पासून लॉकडाऊन होता. आता टप्प्या टप्प्यानं देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी मुंबईसह राज्यात शाळा-महाविद्यालये अद्याप बंद आहेत. अनेक खासगी-शासकीय कार्यालये बंद आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफलाईन थांबली आहे. त्यामुळे अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्यास सांगितले आहे. मात्र तरी देखील आधीसारखं सुरळीत कधी होणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात TIFR ने एक अहवाल तयार केला आहे. TIFR नं आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे सादर केला आहे.

TIFR नें सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील लोकल आणि कार्यालये 1 नोव्हेंबरपासून आणि शाळा 1 जानेवारी 2021 पासून सुरु होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. TIFR चा अहवाल गणितीय दृष्टीकोनावर आधारीत आहे. स्कूल ऑफ टेक्नोलॉजी आणि कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांच्या समितीने हा अहवाल तयार केला आहे. हर्ड इम्युनिटीनुसार 75 टक्के झोपडपट्टी आणि 50 टक्के इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये डिसेंबर किंवा जानेवारी 2021 पर्यंत अँटी बॉडीज निर्माण होतील.

TIFR अहवालात काय म्हटले आहे ?
TIRF च्या अहवाला म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये 30 टक्क्याने मुंबई शहर सुरु केले जाऊ शकते. अटी आणि शर्तींवर शहरातील कार्यालये आणि परिवहन सेवा सुरु केल्या जाऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता 50 टक्क्याने वाढवता येऊ शकते. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्णपणे सुरु करता येऊ शकतं. मात्र, सार्वजनिक परिवहन सेवेतील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. शिवाय मास्क तोंडाला लावलेच पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी हातांची स्वच्छता राहली गेली पाहिजे. तसेच गाड्या आणि कामाच्या ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण केले गेले पाहिजे, अशा सूचनाही या अहवालात दिल्या आहेत.