दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकार सज्ज, आचारसंहितेची अडचण नाही : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळावर मात करण्यासाठी आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान दुष्काळाला तोंड देण्यासाठी पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच याकरिता आचारसंहितेची अडचण नसल्याचे देखील फडणवीस यांनी माध्यमांशी बालताना स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यामध्ये सर्वाधिक टँकर औरंगाबाद येथे पाहायला मिळतायत जयकवाडीचा पाणीसाठा आत्ता आपण वापरत आहोत. दुष्काळाचा आढावा घेण्याकरिता कुठेही आचारसंहितेची अडचण नाही आणि त्यामुळे पालकमंत्र्यांना आम्ही निर्देश दिले आहेत की आपापल्या जिल्ह्यात त्यांनी दुष्काळाचा आढावा घ्यावा. चार छावण्यांना देखील भेटी द्याव्यात.

टँकरला जीपीएस यंत्रणा
टँकर्स च्या संदर्भात बोलायचे झाल्यास सर्व टँकरला जीपीएस लावलेले आहेत. त्यावर आपण नजर ठेऊन आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबरोबरच २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार नाही तर २०१८ च्या आकडेवारीनुसार आणि टँकर्स देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कुठे आवश्यकता असेल तर अन्नधान्य देखील देत आहोत तसेच कुठे अधिक गरज असेल तिथे देखील अन्नधान्य पुरवण्याची सोय करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री बैठकीनंतर बोलताना म्हणाले. यंदा पाऊस उशिरा येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ती बाब चिंतेची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (११२)

सांगली (५) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव

सातारा (१) : माण-दहीवडी

सोलापूर (९) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर

पालघर (३) : पालघर, तलासरी, विक्रमगड

धुळे (२) : धुळे, सिंदखेडे

जळगाव (१३) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल

नंदुरबार (३) : नंदुरबार, नवापूर, शहादा

नाशिक (४) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर

अहमदनगर (११) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड

औरंगाबाद (९) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड

बीड (११) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,

जालना (७) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर

नांदेड (२) : मुखेड, देगलूर

उस्मानाबाद (७) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम

परभणी (६) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू

हिंगोली (२) : हिंगोली, सेनगाव

अमरावती (१) : मोर्शी

बुलडाणा (७) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा

यवतमाळ (६) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव

चंद्रपूर (१) : चिमूर

नागपूर (२) : काटोल, कळमेश्वर

मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (३९)

पुणे (७) – आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी

सातारा (२) – कोरेगांव, फलटण

धुळे (१) – शिरपूर

नंदुरबार (१) – तळोदे

नाशिक (४) – देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड

नांदेड (१) – उमरी

हिंगोली (१) – कळमनुरी

लातूर (१) – शिरुर अनंतपाळ

अकोला (५) – बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला

अमरावती (४) – अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी

बुलडाणा (१) – मोताळा

वाशिम (१) – रिसोड

यवतमाळ (३) – केलापूर, मारेगांव, यवतमाळ

चंद्रपूर (४) – ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही

नागपूर (१) – नरखेड

वर्धा (२) – आष्टी, कारंजा