कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एकमेकांवर टीका करण्याचे सत्र चालूच आहे. आता नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. ‘ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi in Serampore, West Bengal: Didi, on 23 May when the results will come, lotus will bloom everywhere and your MLAs will leave you. Even today, didi, 40 of your MLAs are in contact with me. pic.twitter.com/XaZQ4BORwO
— ANI (@ANI) April 29, 2019
यावेळी बोलताना पश्चिम बंगालमध्ये भाजपलाच विजय मिळेल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. २३ मे च्या निकालाच्या दिवशी तुम्हाला सगळीकडे भाजपच दिसेल, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगाल मधल्या सेरामपूर येथे आयोजित केलेल्या सभेदरम्यान ते बोलत
तुमचे आमदार आमच्या कायम संपर्कात…
‘तुमचे आमदार आमच्या कायम संपर्कात आहेत. तुम्हाला सोडून हे आमदार आमच्याकडे येतील’, असा इशाराही त्यांनी ममता बॅनर्जींना दिला. तुम्ही तुमच्या लोकांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांना आमच्यासोबत यायचं आहे. त्यामुळे आता ममता दीदी तुमच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत, असं नरेंद्र मोदी जाहीर सभेत म्हणाले.