Coronavirus Lockdown : अखेर आरोग्य मंत्र्यांनीच सागितलं, एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 690 वर पोहचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये 14 एप्रिलनंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही काळजीची गोष्ट असून लोकांनी बाहेर पडू नका, खबरदारी घ्या. एकदम लॉकडाऊन संपणार नाही. जिथं काहीच नाही तिथ प्रथम लॉकडाऊन हटवला जाईल. पण जिथं संख्या जास्त तिथं वेगळा विचार करून निर्णय घेतला जाईल. आज दिवे लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यात विज्ञान नाही, पण देशाचा ऐक्य विषय असावा, लोकांनी गर्दी करून नये इतकंच अपेक्षित आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनीच आत थेट लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे संकेत दिल्याने महाराष्ट्राही लॉकडाऊनचा कालावधी वाढणार हे निश्चित आहे. मात्र, काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. कारण जिथं रुग्णांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी लॉकडाऊनबद्दल विचार केला जाईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितले. त्यामुळे 14 एप्रिलनंतर सरकार नेमका कोणता निर्णय घेतं हे पाहावं लागेल.

हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन गरजेचं
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच फक्त लॉकडाऊन संपवण्याची आवश्यकता नाही. उदाहारणार्थ तामिळनाडूमध्ये सर्व जिल्हे कोरोना प्रभावित नाहीत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लॉक करणे काही अर्थ नाही. फक्त हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरु राहील असे आयसीएमआरने सांगितले आहे.