‘बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान, विरोधकांचा पॅटर्न सर्वांच्या लक्षात आलाय’
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. विरोधकांचा हा नवीन ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर निशाणा साधण्याचे काम विरोधकांनी बंद करावे, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लागावला आहे. बिहारच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावल्यापासून बिहारमध्ये महाराष्ट्र्रात घडणाऱ्या घडामोडींची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा यावर भाष्य केले आहे.
धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली….. https://t.co/RD7yapsC2L pic.twitter.com/2jm7ABbcan
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 14, 2020
आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारची निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु झाले आहे. तसेच आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्र्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपकडून करण्यात आली आहेत. बिहार निवडणुकीत पक्षाला फायदा होण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ जनतेच्या लक्षात आला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर निशाणा साधण्याचे काम विरोधकांनी बंद करावे, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही, असे रोहित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजप सरकारच्या काळात आणि भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील काहीं गोष्टींकडे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. शेतकरी धर्मा पाटील यांनी भाजप सरकारच्या काळात न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या केली होती. आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात दिवसाढवळ्या बलात्कार आणि खून यांसारखे गुन्हे घडत आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकाराना गाडीखाली चिरडून मारण्यात आले. महाविकास आघाडी सरकार हे न्यायच्या बाजूने उभं राहणार सरकार आहे. पण काही लोकांना पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकांना झालेली मारहाण असो या प्रकरणाची महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. तसेच रामदास आठवले यांनी मुंबईतील एका घटनेचा आधार देत राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली. त्यांच्यावरदेखील रोहित पवार यांनी टीका केली आहे.