धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – प्रेयसी कडून होणाऱ्या स्पेलिंग ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील माळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे.

सागर विलास कानडे (वय 25, रा. जुनी वसंत टॉकीज, माळीवाडा) हे मयताचे नाव आहे. गौरी किसन जगताप (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, काही दिवसांपासून सागर कानडे याचे माळीवाडा परिसरात तात्पुरत्या राहण्यास आलेल्या गौरी जगताप हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या त्रासाला कंटाळून त्याने 2 मे रोजी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत कानडे यांनी आत्महत्यपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तू तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत रहायला ये. मला पैसे दे, असे म्हणून ब्लॅकमेलिंग करीत होती. तिच्या त्रासाला कंटाळून कानडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी मयताचे सागरचे वडील विलास मोहनराव कानडे (वय 51) यांच्या फिर्यादीवरून गौरी जगताप हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवकानेच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.